Posts

घरोघरी मातीच्या चुली - 3

घरोघरी मातीच्या चुली - 1 घरोघरी मातीच्या चुली - 2 ---------- "ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी." "पुन्हाऽऽ?" "ओरडायला काय झालं इतकं?" "अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?" "छे! महिना होत आला." "अगं, पण मग इतक्यात पुन्हा?" "हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?" "कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??" "(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..." "पण जायचंय कुठे?" "अरे, गेला आठवडाभर नाही का मी त्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होते..." "(हायसं वाटून) अच्छा, तो कार्यक्रम आहे होय." "शी! कार्यक्रम काय म्हणतोस त्यालाऽऽ!" "तेच गं ते, अर्थ एकच... जा तू बिनधास्त! मी सांभाळीन मुलांना." "मुलांना सांभाळायचं आहेच तुला, पुढचे ३-४ तास." "कधी जायचंय?" "आजच रात्रीऽऽऽ! आज ब्यूटिशियनला बोलावलंय, म्हणजे आजच असणार ना? की उद्या असणारे? इतक्या वर्षांत एवढंही कसं कळले...
सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले. ----------------------------- कुणी लिहितं कविता, कुणी खरडतं चारोळ्या, पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच अंतरात्म्याच्या आरोळ्या... मारावी आरोळी, नाहीतर पिटावा हाकारा, पण समर्थपणे तोंड द्यावं, परिस्थितीच्या नकारा ! परिस्थिती, परिस्थिती, अरे कोण ही परिस्थिती? तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली यथेच्छ निंदा-नालस्ती ती... जनाची निंदा, मनाची नालस्ती, करत होते का पुराणातले ऋषी अगस्ती? अरे, पुराणातली वांगी राहू देत पुराणात, आधी कामाकडे लक्ष द्या, मीठ विसरलंय वरणात ! मीठ काय अन्‌ साखर काय, निव्वळ दोन चवी, आयुष्यगाथा कशी पंचरसांनी परिपूर्ण हवी ! आयुष्याला म्हणावे गाथा नसते अशी प्रत्येकाकडे कथा, मग कुणी खरडतं चारोळ्या, तर कुणी लिहितं कविता !!

पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'

दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख  इथे  वाचता येईल. ---------- २६/११बद्द्ल सर्वकाही २६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत. २६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’ दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झ...

पुस्तक परिचय - 'हेडहंटर'

रविवार दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तकपरिचयपर लेख. मूळ लेख  इथे  (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ---------------------------------- ‘ड्रीम जॉब’ हा कॉर्पोरेट जगतातला परवलीचा शब्द आहे. हव्या असलेल्या चांगल्या नोकरीची एखादी संधी जर चालून आली तर वैयक्‍तिक विकासासाठी तिचा उपयोग करून न घेणार्‍याला आजच्या स्पर्धेच्या युगात करंटाच ठरवले जाईल. अधिक चांगली नोकरी आणि अधिक पैसा यामागे जसे कनिष्ठ नोकरदार धावत असतात तसेच उच्चपदस्थ आणि अतिउच्चपदस्थही धावत असतात. उच्चपदस्थांच्या अश्या नोकरीबदलामुळे कंपन्यांनाही त्यांच्या जागी अन्य सुयोग्य माणसे हवीच असतात. आपल्याकडे जे, जितके आहे त्यापेक्षा अधिक काही मिळवण्याची हीच मानवी प्रवृत्ती काहीजणांच्या आयुष्याला एका निराळ्या पण योग्य अर्थाने कलाटणीही देऊ शकते. त्यांच्यातल्या अंगभूत गुणांना त्यामुळे स्वकर्तृत्वाचे कोंदण मिळते. ‘हेडहंटिंग’सारख्या भारतात अजून बाल्यावस्थेत असलेल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे गिरीश टिळक हे या वर्गाचे दमदार प्रतिनिधीत्त्व करतात. कॉर्पोरेट कंपन्यांची गरज ओळखून, त्यांच्यासाठी योग्य ...

हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन !!

‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं. काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं. ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्‍या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभाग...

घरोघरी मातीच्या चुली - २

घरोघरी मातीच्या चुली - १ ---------- "अहो, काय हे...!" ".........." "तुम्हाला करण्यासारखं दुसरं काही नव्हतं काऽऽ?" "(काहीच न कळून) नाही ना! हातातलं लेटेस्ट प्रोजेक्ट संपलंय. आणि आता मी काही पूर्वीसारखा बिझी राहिलेलो नाही या प्रोजेक्टवरून लगेच पुढच्या प्रोजेक्टवर उडी मारायला..." "(हात झटकत) तुमच्या प्रोजेक्टची कौतुकं मला नका सांगू! पूर्वपुण्याईवर अजूनही लोकं तुम्हाला बोलावतायत. नाहीतर काही खरं नव्हतं." "ते काही का असेना! पण आपला एकुलता एक मुलगा अजूनही स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडतोय. तोपर्यंत एक बाप म्हणून आर्थिक भार उचलणं माझं कर्तव्य नाहीये का?" "कोण म्हणेल तो अजून स्थिरस्थावर झालेला नाहीये?" "का? मीच म्हणतोय! तुझ्यामाझ्यात काय लपवालपवी करायची? अभिषेक अजूनही हातपायच मारतोय हे सत्य नाहीये का?" "हातपायच मारत असता, तर हे... हे शक्य झालं असतं का?" "काऽऽय शक्य झालं असतं का?" "(हातातला पेपर नाचवत) हेच... आज सकाळी जे मी वाचलंय ते..." "(समजुतीच्या सुरात) या वयात असा...

गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.

Image
आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असण...