Posts

Showing posts from January, 2012
सहज सुचत गेल्या आणि एकापुढे एक लिहित गेले या साखळी-चारोळ्या. गंमत म्हणजे, पुन्हा पहिल्या चारोळीपाशी नकळत परतले. ----------------------------- कुणी लिहितं कविता, कुणी खरडतं चारोळ्या, पसंद अपनी अपनी, कारण शेवटी सगळ्याच अंतरात्म्याच्या आरोळ्या... मारावी आरोळी, नाहीतर पिटावा हाकारा, पण समर्थपणे तोंड द्यावं, परिस्थितीच्या नकारा ! परिस्थिती, परिस्थिती, अरे कोण ही परिस्थिती? तिचं नाव पुढे घालून नशिबानं चालवलेली यथेच्छ निंदा-नालस्ती ती... जनाची निंदा, मनाची नालस्ती, करत होते का पुराणातले ऋषी अगस्ती? अरे, पुराणातली वांगी राहू देत पुराणात, आधी कामाकडे लक्ष द्या, मीठ विसरलंय वरणात ! मीठ काय अन्‌ साखर काय, निव्वळ दोन चवी, आयुष्यगाथा कशी पंचरसांनी परिपूर्ण हवी ! आयुष्याला म्हणावे गाथा नसते अशी प्रत्येकाकडे कथा, मग कुणी खरडतं चारोळ्या, तर कुणी लिहितं कविता !!