Posts

Showing posts from 2015

परिघावरून

एके दिवशी सकाळी... गजर वाजायच्या एक मिनिट आधी बॅनर्जी आजोबांना जाग आली. मोबाईलवरच्या 04:59कडे नजर टाकत ते उठले, बाथरूममधे गेले. नळ सोडून त्यांनी पायावर पाणी घेतलं, तोंडावर मारलं; उगीच एकदा सोलरचा नळ उघडून पाहिला. पण तो अजून तरी कोरडा ठक्क होता. ते बाथरूममधून बाहेर आले; सावकाश पावलं टाकत स्वयंपाकघरात गेले; स्वतःसाठी एक कप चहा करून ठेवून अंथरूण आवरायला परत आपल्या खोलीत आले. दुसर्‍या बेडरूमच्या बंद दाराआडून वाजलेला फोनवरचा गजर त्यांना अंधूकसा ऐकू आला. पुन्हा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी चहा गाळून घेतला, पातेलीत थोडं नळाचं पाणी घालून गाळणं त्यात बुडवून ठेवलं आणि पातेली सिंकजवळ ठेवून दिली. दुसर्‍या बेडरूममधला गजर पुन्हा एकदा वाजला. त्यांचा चहा पिऊन होईतोवर त्यांची सून उठून बाहेर आलेली होती. ओट्याशी आल्या-आल्या तिनं आधी जोरात नळ सोडून गाळणं त्याखाली धरलं, ओट्याच्या कडेवर आपटत ते स्वच्छ केलं. ते होताच आपल्या मुलाला जोरात हाक मारली. "राघवऽऽ" राघव कूस बदलून, पांघरूण ओढून परत झोपी गेला. चहा घेऊन आजोबा बाहेर पडले. सोसायटीच्या आवारात फिरत त्यांनी थोडी फुलं गोळा केली आणि मग ते आ

येऊरच्या जंगलात...

Image
अनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख. ---------- कुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो. येऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे. हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्र

वस्ती जेव्हा रंगमंच बनते

Image
सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती... ऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष! नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं? ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं. हा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्‍या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. -----