एका कवितेच्या निमित्ताने...


माझा मुलगा आदित्य, इ. ९ वी.
समाजशास्त्राची एक असाईनमेंट म्हणून त्यानं शाळेत कुठल्याही पूर्वतयारीशिवाय ही एक अतिशय सुंदर कविता लिहीली.
विषय होता : वन्यजीव आणि त्यांचे संरक्षण.
Heal the wild,
Heal the life
and when their distress becomes mild
go for it and invoke the past
as our forefathers did
Live with the animals, not against them
Learn to weave and hem
Your existence with them
And when their pain becomes mild
Go for it, foresee the future
As we would do in the due coming time
Or
Animals from ages,
Would be pushed to the edges,
And then to the pages......
Off goes their existence,
If we don't do the present
or their sheer living, will get small as a crescent
Heal the wild,
Heal the life
आज ही कविता इथे टाकण्याचं अजूनही एक कारण आहे.
दहावीच्या परिक्षा, अकरावीचे प्रवेश, एस.एस.सी. बोर्ड विरुध्द सी.बी.एस.ई. बोर्ड इ. वरून चाललेले सततचे गदारोळ आपण वर्तमानपत्रातून वाचतच असतो. त्या पार्श्वभूमीवर (मराठीचा सार्थ अभिमान बाळगून) हे सांगावंसं वाटतं की सी.बी.एस.ई. बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधल्या परिक्षापध्दतीत काही चांगले, स्वागतार्ह बदल होत आहेत. (ही कविता हा त्याचाच एक परिपाक आहे असं मला वाटतं.)
प्रश्नोत्तरांची घोकंपट्टी करून परिक्षेच्या तीन तासांत पोपटपंची करून गुण मिळवायचे दिवस किमान सी.बी.एस.ई. बोर्डापुरते तरी हळूहळू मागे पडतायत. निव्वळ पुस्तकी अभ्यासाला महत्त्व न देता विद्यार्थ्यांची लेखन-संभाषण कला, नेटकी शब्दयोजना, सभाधीटपणा, चार जणांना आपला मुद्दा समर्थपणे पटवून देण्याची कला, एखाद्या विषयावरच्या साधकबाधक चर्चेत आत्मविश्वासानं सहभागी होण्याची कला इ. गोष्टीही मूल्यमापनात ग्राह्य धरल्या जात आहेत. त्या अनुषंगाने गेल्या १-२ वर्षात सी.बी.एस.सी.च्या परिक्षा पध्दतीत हळूहळू पण आमूलाग्र बदल घडवून आणले जात आहेत.
बदलाच्या या काळात काही पालक नाराज आहेत तर माझ्यासारखे काही अतिशय खूष आहेत.
आज ही कविता इथे टाकताना त्यामागे एक कौतुक करणारी आई तर आहेच; त्याहीपेक्षा या बदलांच्या स्वागताला दोन्ही हात पसरून उभी असलेली एक आशावादी पालकही आहे!

Comments

Mugdha said…
Faarach chaan aditya !!!! keep it up ..
Nandan said…
छान आहे कविता. नेमके शब्द आणि त्यापेक्षाही कवितेतून दिसणारी जाणीव - फारच सुरेख.
शब्दयोजना नेटकी आहे. कविवर्यांना शुभेच्छा!
आणि हो सी. बी. एस. ई हवे. सी. बी. एस. सी. झाले आहे.
मनोगती,
बदल केला आहे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
मराठी माध्यमातील मुलांचे मराठीही कदाचित त्याच तोडीचे असू शकेल. मात्र ते कदाचित तुमच्या लक्षातही आलेले नसावे. म्हणूनच तुमचा मुद्दा -शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढायला हवी आहे. सी.बी.एस.सी मधे ती इतर शाळांच्या तुलनेत जास्त वाढत आहे. - हा एककल्ली विचारसरणीचा द्योतक आहे.

महाराष्ट्रातील इतर मराठी शाळांतील मराठीची गुणवत्ता तुम्ही समजता त्यापेक्षा बरीच चांगली आहे.

तरीही एकूणातच शालेय शिक्षणात, वास्तव जीवनात आवश्यक असणार्‍या कौशल्यांना प्राधान्य असावे हे खरेच आहे.

आदित्यची कविता सुंदरच आहे. आकलन, विचार, अभिव्यक्ती आणि सुबोधता या सर्वच बाबतीच अनुसरणीय आहे. अशाच वास्तवांना सामोरे जाणार्‍या विचारांचे त्याने संवर्धन करावे. त्याकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा!
’शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढायला हवी आहे’ हा माझा मुद्दा मुळीच नाही. मी तिथे स्पष्टपणे तसं म्हटलंय की - घोकंपट्टी, पोपट्पंचीच्या पलिकडे जाऊनही विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता जोखण्याचे इतर अनेक चांगले मार्ग आहेत ज्यांचा अवलंब व्हायला हवा. सी.बी.एस.ई.च्या शाळांमधे तशी सुरूवात झालेली आहे. सध्या माझ्या मुलाच्या शाळेत मूल्यमापनाची जी नवी पध्दत अमलात आणण्यात येते आहे तशी कुठल्याच एस.एस.सी.बोर्डाच्या शाळेत अजून आलेली नसेल... हे मला अधोरेखित करायचं होतं.
सध्या माझ्या मुलाच्या शाळेत मूल्यमापनाची जी नवी पध्दत अमलात आणण्यात येते आहे तशी कुठल्याच एस.एस.सी.बोर्डाच्या शाळेत अजून आलेली नसेल... >>

कृपया, ती नवी मूल्यमपनाची पद्धत इथे जरा तपशीलाने सांगितलीत, तर मलाही उपयोगाची ठरेल!
नरेंद्रजी,
जरा उशीरानेच उत्तर देत आहे त्याबद्दल दिलगीर आहे.
पण ती नवीन मूल्यमापनाची पध्दत इथे सांगता येणं कठीण आहे. (पालकांना ती समजावून देण्यासाठी शाळेतर्फे दीड-दोन तासांची मिटींग घेण्यात आली होती. )
लेखात म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना त्यात बऱ्यापैकी वाव मिळतोय असं माझं तरी निरिक्षण आहे.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)