मतदान आणि आनंदाश्रू
मी सुयश काटकर. एफ. वाय. बी. एस्स. सी. मागच्या आठवड्यात पेपरमध्ये एक छोटीशी बातमी वाचली - मुंबई अतिरेकी हल्यानंतरची एक उपाययोजना म्हणून गेट-वे च्या समुद्रातल्या सगळ्या होडी, बोटी हटवण्यात येणार आहेत म्हणे! का? तर अतिरेकी समुद्रातून आले म्हणून! यडचाप आहेत का हे राजकारणी, पोलीस? बोटी हटवणार काय... त्याच नियमानं मग लोकलगाड्यांत बॉंबस्फोट होतात म्हणून लोकलगाड्या बंद करा किंवा WTC वर विमानं धडकली म्हणून अमेरिकेतली विमानं बंद करा! अरे, काय हे! इनको कोई लेके जाओ या ऽ ऽ र! बोटी बंद केल्या तर मग लोकांनी एलिफंटा केव्हज पहायला जायचं कसं? तो तुमचा सांस्कृतिक ठेवा की काय आहे ना? अरे, साधा विचार करा... बोटी बंद झाल्या, एलिफंटाची वर्दळ कमी झाली की हेच अतिरेकी एक दिवस तिथेही आपला अड्डा बनवतील! आणि उद्या, म्हणे, समुद्रात तुम्ही शिवाजीमहाराजांचं भव्य वगैरे स्मारक उभारणार आहात! मग तिथेही लोकांनी कसं जावं असं तुमचं म्हणणं आहे? पोहत की उडत? कॉलेज कॅंटीनमध्ये सगळ्यांना ही बातमी सांगितली. ते ऐकून सम्या लगेच उठला आणि म्हणाला, "चला, बिना बोटींचा गेट-वे चा समुद्र कसा दिसतो ते बघून येऊ"! हा सम्या सुद्...